30/06/2021
Baloon Decoration
Event Management
Birthday decoration
Baby shower decoration
Shop/office decoration
Ganesh /Gauri Fest. decore
ring ceremony. baby naming ceremony decor
Baloon Decoration
We are back with all new concepts and designs to celebrate your precious events.
सोहळा इव्हेंट
नारायणगाव
९८५०9८३०३७
सोहळा फेटा मेकर्स
सोहळा फेटा मेकर्स पुणे
SOHLA EVENTS NAMING CEREMONY AT NARAYANGAON
सुंदर लेख ....एकदा मन लावून संपूर्ण वाचाच 🙏🏻🙏🏻
🏠 : घरात मोठं कुणीतरी पाहीजेच...👵👴
पूर्वी घरांत उंबरठे आणि मोठी (वयस्कर) माणसं असायची.
त्यामुळे घराचा कारभार मर्यादेत आणि धाकात चालायचा .
कुठल्याही कार्याचा श्रीगणेशा करण्याआधी घरातील जेष्ठ मंडळीचा सल्ला असायचा,
त्यांच्या अनुभवाचे सर्व विचार करायचे
त्यामुळे घरातील देवघरा नंतर महत्वाचे स्थान म्हणजे घरातील वयस्कांचे..!!
आताची वास्तविकता पार वेगळी आहे. काळानुसार घरात गुळगुळीत फरश्या बसल्या आणि
घरातील सदस्य घराच्या मर्यादा आपआपल्या सोयीने ठरवू लागला......
स्वयंपाक खोली काय अन् देवघर काय सगळीकडे
घरभर चपला घालून फिरायला सुरुवात झाली.......
मोठी माणसं नाहीशी होत आहेत त्यामुळे धाक नावाची गोष्ट सुद्धा लोप पावत चालली आहे .
मर्यादा , धाक , शिस्त , संस्कृती इत्यादि प्रकारच्या या गोष्टी हल्ली
व्हॉट्स ऍप वर सकाळी सकाळी वाचण्यापुरत्या राहील्या आहेत .
पूर्वी ह्याच गोष्टी , चालिरिती घरातील मोठी माणसे सांगायची.....
म्हणून 🏠 घरात मोठी वयस्क माणसे पाहीजेत......
संध्याकाळी दिवे लावणीला शुभमकरोति - रामरक्षा चा सूर कानावर पडलाच पाहीजे......
रात्री घरी उशिरा आल्यानंतर काळजीपोटी प्रश्नोउत्तरे झालीच पाहीजे....
रात्रीचं उरलेलं अन्न टाकून देण्याऐवजी त्याला फोडणी -तडका देऊन
आणखी चविष्ट व चटपटीत बनवून सकाळच्या न्याहरीत वाढणार कुणीतरी पाहीजे.......
मोजून-मापून खर्च कसा करायचा याचे धडे शिकवणारे कुणीतरी पाहीजे .
चुकलं तिथे रागवायला व कधीतरी तोंड भरून कौतुक करायला ....
🏠 घरात कुणीतरी मोठ पाहीजे हो......
एकाच छताखाली सर्वांना एकत्र पद्धतीत बांधून ठेवणारं......
टिव्ही बंद ठेवून सर्वांनी सोबत जेवण का करावं यामागचं कारण उत्तमरित्या पटवून देणारं.......
बाहेर पडतांना देवापुढचा अंगारा कपाळावर लावणारं...
आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणारं तर
संकटाच्या वेळी आपल्यासाठी देवाला पाण्यात ठेवून माळ जपत प्रार्थना करणारं ......
खरच 🏠घरात कुणीतरी मोठ पाहीजेच......
पिकलेले पांढरे केस असू देत की अंधुक झालेली नजर...
आशीर्वाद देताना थरथरणारे हाथ असू देत की सुरकुत्या पडलेलं शरीर...
लिंबू-मिरची ला मानणारे विचार असू देत की कावळ्याच्या शापाला घाबरणारे मन...
एक गोष्ट चार-चार वेळा सांगणारं बडबड मुख असू देत की कमी ऐकू येणारे कान....
कसं का असेना...सांगसवर करणारं .......
🏠घरात कुणीतरी मोठ पाहीजेच.
ज्या झाडाला फळं-फुलं येत नाही त्या झाड़ाला आपण बिनकामी झाड म्हणतो
परंतु ते झाड़ फळ-फुलं जरी देत नसेल तरी निदान सावली तर देते,
त्या सावलीत आपली अनेक कामे सहज होतात.
घरातील मोठी-वयस्कर माणसं ही तशीच असतात...
त्यांच्या असण्यानेच आपल्याला नकळत खूप आधार होतो.
त्यांचे अस्तित्व आपल्यासाठी खुप मोलाचे असते.
घरातून बाहेर पडतांना डोकं ठेवून नमस्कार करण्यासाठी घरात ते अनुभवी पाय पाहीजेच.
🏠 घरात मोठ कुणीतरी पाहीजेच... 👵 👴 👩👨...👵👴.....👀
🙎 #लेक_माझी
🙎 अशी कशी लेक, देवा,
माझ्या पोटी येते
नाव सुद्धा माझं ती
इथेच ठेऊन जाते।।🙎
🙎 पहिला घास, देवा, ती
माझ्या कडून खाते
माझाच हात धरुन ती
पहिलं पाऊल टाकते।। 🙎
🙎 माझ्याकडूनच ती
पहिलं अक्षर शिकते
तिच्यासाठी सुद्धा मी
रात्र रात्र जागतो।।🙎
🙎 कुशीत माझ्या झोपण्यासाठी
ती गाल फुगवुन बसते
मी आणलेला फ्रॉक घालून
घर भर नाचते।।🙎
🙎 अशी कशी लेक, देवा,
माझ्या पोटी येते
असे कसे वेगळे हे
तिचे माझे नाते।। 🙎
🙎 एक दिवस अचानक, ती,
मोठी होऊन जाते
बाबा , तूम्ही दमला का, ?
हळूच मला विचारते॥ 🙎
🙎 माझ्या साठी कपडे, चप्पल,
खाऊ घेऊन येते
नव्या जगातील नविन गोष्टी
मलाच ती शिकवते।। 🙎
🙎 तिच्या दूर जाण्याने
कातर मी होतो
हळूच हसून मला ती
कुशीत घेऊन बसते।।🙎
🙎 कळत नाही मला, देवा,
असे कसे होते
कधी जागा बदलून ती
माझीच आई होते।।🙎
🙎 देव म्हणाला, ऐक, पोरी
तुझे, तिचे नाते विश्वाच्या ह्या साखळीची
एक कडी असते।। 🙎
🙎🙎 तुझ्या दारी फुलण्यासाठी
हे रोप दिले असते
सावली आणि सुगंधाशी तर
तुझेच नाते असते।।🙎🙎
🙎🙎 वाहत्या प्रवाहाला, कोणी,
मुठीत कधी, का, धरते ?
मार्ग आहे ज्याचा, त्याचा
पुढेच असते जायचे।।🙎
🙎 तुझ्या अंगणातली धारा ही
"जीवनदात्री" होते
आणि वाहती राहण्यासाठीच
"गंगा" ''सागराला" मिळते।
एक तरी मुलगी असावी
उमलताना बघावी
नाजूक नखरे करताना
न्याहाळायला मिळावी 🙎🙎
🙎 एक तरी मुलगी असावी
साजिरी गोजिरी दिसावी
नाना मागण्या पुरवताना
तारांबळ माझी उडावी 🙎🙎
🙎 एक तरी मुलगी असावी
मैचींग करताना बघावी
नटता नटता आईला तिने
नात्यातली गंमत शिकवावी 🙎🙎
🙎🙎 एक तरी मुलगी असावी
जवळ येऊन बसावी
मनातली गुपितं तिने
हळूच कानात सांगावी 🙎🙎
😊😊एक तरी मुलगी असावी
गालातल्या गालात हसावी
कधीतरी भावनेच्या भरात गळ्यात मिठी मारावी......!
🙎 ी_मुलगी_असावी 🙎
dedicated to all beautiful Daughters
वि. स. खांडेक...
माणसाने विझलेले दिवे सुध्दा पहायचे असतात, मग तेजाळणाऱ्या दिव्याची महती समजते.तेजाच्या वलयाची जाणीव होते. दिवे जळून विझले की त्यांची असहायता समजते.ते का विझले असावेत याचा अंदाज घेता येतो.विझलेल्या दिव्यांची वेदना समजून घेता येते.
आपण जेंव्हा वेदनेच्या परिछायेत असू त्यावेळची जाणीव होते आणि तस पाहिले तर प्रत्येक दिव्याला विझावच लागत.कधी वेळ आल्यावर तर कधी अवेळी पण.दिवे जेंव्हा प्रकाशमान असतात तेंव्हा प्रत्येकाला ते आवडतात. पण याचा अर्थ असा नाही की अंधार उपयोगी नसतो.अंधार पण वेदनेला पोटात जागा देतो. आसवं मुक्तपणे ओघळू देण्यासाठी अंधाराएवढी सुरक्षित जागा कोणतीही नाही.
अंधार आहे म्हणून प्रकाशाला किंमत आहे.वेदना आहे म्हणून आनंदाला महत्व आहे.प्रकाश हा अंधारातून जन्म घेतो.म्हणून विझलेला दिवासुध्दा आपण पहायलाच हवा तरच तेजोमय दिव्याचे महत्त्व कळेल.
दिवाळी समाप्तिच्या हार्दिक शुभेच्छा 🌷🌷🌷🌷🌷
हे पांडू ...
तुझा नंबर पण नव्हता माझ्याकडे, एक दिवस सहज फेसबुक चाळताना सजेशेन मधे तुझं प्रोफाईल दिसलं आणि उगीच माझ्या काळजाची धड धड वाढली, मी उगीचंच इकडे तिकडे बघितले, क्लिक करू कि नको करू कि नको विचार करत धाडसानेच क्लिक केला, जणू काय तुला समजणारच होते. आणि तुझं प्रोफाईल सावकाश चाळू लागले, चुकून एखादा लाईक जाऊ नये हि भीती होतीच. तेवढ्यात नवरा आला आणि कधीच न घाबरणारी मी तुझं प्रोफाईल हटवायचा प्रयत्न करू लागले. दोन वर्ष एकत्र कॉलेज केले, आपल्यात काहीच नसताना असं का झालं असावं? खरंच आपल्यात काही होतं? किंवा आपल्यात खरंच काही नव्हतं? बाकी तुझे बनियान वरचे फोटो पाहून मला उगीच कसंतरी झालं, आता मस्कुलीन दिसतोय, तेव्हा किती हडकुळा होतास, पण बॉलिंग टाकताना बघीतलं कि वाटायचं ह्या काडी दंडात एवढी ताकद कुठून येते, पन्नास मीटर वरून पळत येवून कॉलेजच्या टूर्नामेंट मध्ये जेव्हा तू एकजनाला बोल्ड करताना स्टंप मोडला होता त्यावेळी मला उगीच जास्त आनंद झाला होता. आणि हो तो ढगळा टी शर्ट आणि चप्पल घालून ब्याटिंग करणारा तू एकटाच कॉलेज मध्ये. किती सहज फटके मारायचास. ते ओरिसाच्या कुणाच्या तर बॉलिंग वर तू पोइंटला सहजच बॉल मैदानाबाहेर फेकला होता आणि बॉल कडे नंतर बघितले सुद्धा नव्हते, आपलं नुसतं चड्डीतलं गार्ड व्यवस्थित करण्याचे नाटक केले होते. मी काय चीरकले होते, खरं सांगू मला तेव्हा तुझ्या दंडाला हात लावायची इछ्या झाली होती. आणि तुझी ती मैत्रीण उगीच शांत बसून पाहत होती, तिच्या तोंडावर लय माज दिसत होता मला. जणू काय मला सगळं माहित आहे, आणि पांडू माझाच आहे.
तू सामना संपवून येताना कुणाकडेच नाही, तुझ्या त्या मैत्रिणीकडे पण नाही, पण माझ्याकडे टाकलेली नजर अजून माझ्या अंगावर काटा आनते. आपल्या दोघांना माहित होतं, कि आपल्यात काहीतरी आकर्षण आहे, डोळ्यांनी एकमेकांना बोलायचो, पण जवळ भेटल्यावर तू किती सहज बोलायचासं, “काय गं मंजे, जरा अभ्यास बिभ्यास करत जाकी, नेहमी क्यांटीनलाच काय असतेस” मला माहिताय, आपल्या वागण्यात सहजपणा यावा म्हणून तू तसं करायचास आणि मग तू दूर जाई पर्यंत मी नुसतंच तुझ्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बसायची.
बाकी चांगला नाद लावून घेतलाय, आता ट्रेकिंग वगैरे, मला माहिताय, तुला काहीनाकाही नाद लावून घ्यायची सवयच आहे. सिगारेट वगैरे नादापेक्षा ते कितीतरी चांगलं. कॉलेज क्यांटीन मध्ये बाकी पोरं घाबरत असताना, मुलीसमोर सहसा धाडस करत नसताना, तु मात्र बिंधास्त सिगारेट फुकायाचा, माझ्या ग्रुपमधल्या काही मुलींचा तू व्हिलन होतास तर काहींचा हिरो. मला आवडायचा तू, जगाला कोलून त्यांच्यावर धूर सोडत असतानाचा. बाकी आता आपल्या एक दिवस आणि एक रात्रीच्या सहवासात सिगारेट पिला नाहीस, मला नाही वाटत तू मला घाबरला असशील, पण तू सोडली असशील. सोडली तर चागलंच आहे.
You know, असं वाटलं, मी तुझ्या प्रोफाईल वर क्लिक केलं आणि मी घसरले, आता सावरायचं सावरायचं ठरवत असताना तब्बल पंधरा दिवसांनी तुला रिक्वेस्ट पाठवली. मला माहित आहे तू पण मला शोधलं असशील, पण तू माजुरडा आहेस, रिक्वेस्ट पाठवणार नाही हि खात्री होती. मग मीच पाठवली. कारण तीन वर्षा नंतर भारतात येणार होते, तुझी भेट घ्यायला आवडणारच होते. कॉलेजच्या आयुष्या पासून एकदा घसरायची इछ्या होती, तुझ्या बरोबर, ती पूर्ण करण्यासाठी मला तुला भेटायचं होतं, मला माहित नव्हतं कि तू किती प्रतिसाद देशील, पण तेव्हाची ती नजर मला धोका देणार नाही याची खात्री होती...............................
लिहिण्यातून क्रमश......
अगदी मनापासून सांगावसं वाटतंय असा काही..नक्की वाचा
आधीच बालपण संपले ते बरेच झाले.....
लवंगी फटाक्याचा एकच पुडा आख्खी दिवाळी पुरायचा. हिरव्या, गुलाबी रंगाचा तो पुडा अलगद उघडला की आत लवंगीच्या एकावर एक रचलेल्या आठ दहा माळा असत. ( त्या दारुचा एक मस्त वास येत असे. दिवाळीच्या फराळा एवढाच हा वास सुध्दा फार आवडीचा होता.) काही आगाउ पोरं ती माळ एका दणक्यात संपवुन टाकत. आमच्या सारखी शहाणी मुलं मात्र अत्यंत कुशलतेने प्रत्येक माळ सोडवुन सगळे फटाके सुटे करत असु. मग आरामात एक एक फटाका उडवत दिवाळी साजरी होई. पहाट झाली की आपापले फटाके पिशवीत भरुन गल्लीतली पोरं बाहेर यायची. फटाके उडवताना आई वडील मागे उभा असण्याची फँशन त्या वेळी आली नव्हती. त्यामुळे आमचे आम्ही राजे असु. नागगोळी हा एक गंमतीशीर प्रकार. एवढ्याश्या चपट्या गोळीतुन भसाभसा धुर निघुन नागासारखा त्याचा आकार व्हायचा. एक रंगित काडीपेटी मिळायची. ती काडी पेटवली की लाल, हिरवा, गुलाबी रंगांची ज्योत पेटत असे. टिकल्यांची बंदुक हा एक प्रचंड आवडणारा प्रकार. छोट्याश्या गोलाकार डबीतल्या त्या लाल लाल टिकल्या. एक एक बंदुकीत बरोब्बर ठेवुन बार उडवायला स्किल लागायचं. नंतर टिकल्यांचे रोल मिळायला लागले. खटका दाबुन तो रोल पिस्तुल मधे लोड करताना आपण शोले मधल्या अमिताभ पेक्षा कुठेही कमी नाही याची खात्रीच वाटायची. दिवसभर आमची बंदुक चालत असे. दगडाने टिकल्या फोडणे हा फावल्या वेळातला छंद. अँटम बॉम्ब, सुतळी बॉम्ब वगैरे प्रकार जरा जपुनच हाताळावे लागत. सुतळी बॉम्ब ची वात एवढी लहान का करतात हा प्रश्न पडत असे. वात पेटल्यावर पळायला सुरक्षित दिशा कोणती याचा अभ्यास करावा लागे. तरीही नेमकी वात पेटवताना एखादा कार्टा मुद्दाम मागुन आवाज करे आणि आपली फजिती झाल्यावर सगळी पोरं फिदीफिदी हसत असत. बरं वात पेटवुन जर सुतळी बॉम्ब बराच वेळ फुटला नाही तर मात्र फेरतपासणी करताना फार काळजी घ्यावी लागे. वात अजुन पेटती आहे का विझली आहे याची खात्री न केल्याने काही जणांनी तोंड काळे करुन घेतले असायचे. त्यामुळे चहुबाजुंनी गोल फिरुन अंदाज घेतल्यानंतर एक दगड मारुन खात्री केल्यावरच त्याला हात लावला जात असे. फटाके हातात धरुन उडवण्यात आमच्याकडे काही पोरं निष्णात होती. पण आपण तसला फालतुपणा कधी केला नाही. कारण वात पेटल्यावर तो एका विशिष्ट टप्यावर हवेत सोडावा लागे नाहीतर हातात फुटायचा नाहीतर पुन्हा जमिनीवर पडायचा. फुलबाजा, भुईचक्र, पाउस का अनार असले नाटकी फटाके पण असायचे. मला वाटतं भुईचक्र , अनार पेटवायलाच फुलबाजाचा जन्म झाला असावा नाहीतर त्याला स्वतंत्र अशी मजा नाही. मामा नावाचा इरसाल ऐटम मिळायचा. छोट्या डबी एवढा. वात पेटवली की भुर्र आवाज करत गोल फिरत आकाशात उडायचा. ते बाण पण असेच. त्याची वात पण एवढी बारीक का करायचे देव जाणे. बाणाची दिशा फार सांभाळावी लागे. पण त्याकाळी सगळी बैठी घरं असल्याने चिंता नसे. न उडलेले फटाके गोळा करुन त्यातली दारु वेगळी करुन ती पेटवणे हा एक आवडता उद्योग असे. आम्हा पोरांचे दिवाळीचे दिवस असे फटाकामय झालेले असायचे. फार फटाके नसायचे पण जेवढे मिळायचे ते पुरवुन पुरवुन दिवाळी साजरी करत असु. दिवाळीच्या आठवणी फटाक्यांशिवाय पुर्णच होउ शकत नाहीत. पर्यावरण, ध्वनिप्रदुषण असले शब्द यायच्या आधीच बालपण संपले ते बरेच झाले.
Sohla Events Shop decoration
तंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी.
त्या अगोदर आमच्या आईबापांनी चिमणी कंदिलात दिवस काढले.
चार आण्याच्या पोस्ट कार्डवर उभ्या जिंदगीची ख्यालीखुशाली पाठवून उत्तरादाखल कित्येक अस्वस्थ रात्री काढल्या.
चालून चपला झीजवणारी हि शेवटची पिढी.
लग्नातलं लुगडं लेकीच्या पोरीच्या बाळतपणासाठी वापरणारी हि पिढी.
लसून कांद्याच्या जुड्या आड्याला लटकावून वर्षभर पुरवून खाणारी हि पिढी.
रानात दाना दाना वेचूनहि चार कणसाची बोंडे खुशाल दाराबाहेर चिमणी पाखरासाठी राखून ठेवणारी हि माझ्या आई बापाची पिढी.
ठिगळ लावून जगणारीही हि शेवटची पिढी.
कपडे फक्त अंग झाकण्यासाठी असतात हे तत्वज्ञान जगणारी हि शेवटची पिढी.
कदाचित म्हणूनच माझ्या पिढीला जसा तंत्रज्ञानाचा विटाळ नव्हता तसाच माजहि नव्हता.
माझ्या पिढीने बंद पडलेले टीवी कधीच भंगारात विकले नाहीत.
बापाचं घड्याळ घालून आम्ही बोर्डाच्या परीक्षा दिल्या.
संपलेले सेल फोडून आम्ही खेळगाड्या बनवल्या.
ग्याटर आलेले टायर गल्लीबोळातून पळवत तरुण झालो.
तुटलेल्या कॅसेट शिवारात गुंडाळून आणि सायकलच्या रिमची कोळपी बनवून आमच्यातले काही इंजिनियर झाले.
आमच्या पिढीत मोठ्या भावाकडून वारसा हक्काने वापरून जुन्या झालेल्या वस्तू लहान भावांकडे आल्या.
तंत्रज्ञानाने आम्हाला पांगळे केले नाही.
नाती नात्याला आणि माणस माणसांना या नं त्या कारणाने जोडलेली होती.
पण आता मात्र....
गाव पार पार हरवलं.
घरोघरी तंत्रज्ञान घुसलं.
रिचार्ज वाढले talktime संपला.
पिक्सल वाढले जगण्याचा एक्सल कमी झाला.
बघता बघता पिढी फोरजी झाली.
प्रत्येकाचं आयुष्य हि ज्याची त्याची मर्जी झाली.
जगणे मल्टीप्लेक्स झाले.
चौका चौकात पुढा-यांच्या पराक्रमाचे फ्लेक्स आले.
आता तर तो हरवलाय म्हणून पेपरात जाहिरातही देता येत नाही.
कारण हल्ली कळून चुकलंय, गेलेली गोष्ट परत येत नाही,मग ते बालपण असो किंवा गावपण.
या गावाला चूड लावली म्हणून आपण कुणाच्या नावाने खडे फोडायचे ?
या तंत्रज्ञानाच्या ? कारण तो बदलताना आपल्याला गुदगुल्या झाल्या.
तो हरवतानाही आपण होतोच आसपास.
दुःख गाव हरवल्याचं आपल्याला कधीच नव्हतं. गाव हरवला हरकत नाही.
गावपण हरवायला नको होतं.
मुलांना वाया जाऊ द्यायचे नाहीये ??
मग दोन मिनिटे वेळ काढून वाचा !!
***********
शेजारशेजारच्या दोन घरांमध्ये दोघे राहत होते. एका घरामध्ये एक आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये अति श्रीमंत डॉक्टर !
घरच्या अंगणात शोभेची झाडं दोघांनी लावली होती. डॉक्टर आपल्या झाडांना भरपूर पाणी आणि खत देत असे.
आजोबा मात्र फारचं थोडं पाणी आणि खत देत असत.
हळूहळू दोघांकडे असलेली झाडे वाढत होती. मात्र डॉक्टर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आणि आजोबांची झाडं मात्र टुमदार, छान असली तरी अंग धरून होती.
एका रात्री अचानक जोराचा वारा आणि पाऊस आला. दुसऱ्या दिवशी बागेचं नेमकं काय घडलय हे पाहायला दोघेही घराबाहेर आले. समोरच चित्र पाहून डॉक्टरला धक्काच बसला. कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबांची मात्र छान शाबूत होती.
डॉक्टर विचारात पडले, भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊनसुद्धा वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडांची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी. शेवटी न राहून डॉक्टरने आजोबांना याचे कारण विचारले.
**
त्या आजोबांचे उत्तर डोळ्यात अंजन घालणारे होते !!
**
आजोबा म्हणाले "तुम्ही झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविल्या पण अति प्रमाणात आणि त्यामुळेच झाडांची मुळे पोषणाच्या शोधार्थ खोलवर गेली नाहीत. तेच मी माझ्या झाडांना गरजेपुरतेच किंवा थोडे कमी खत आणि पाणी दिले, त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडांची मुळे खोलवर गेली. तुमच्या झाडाची मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याश्या वाऱ्याला आणि पावसाला बळी पडले. माझ्या झाडांची मुळे खोलवर गेल्याने त्यांना मजबुती मिळाली आणि वाऱ्याला आणि पावसाला न जुमानता माझी झाड मस्त उभी आहेत."
***
डीडी क्लास : आपल्या मुलांच्या बाबतीतही असेच असते.. जितके जास्त जपाल तितके मुलांना कमकुवत कराल. निसर्गाने प्रत्येकाला लढण्याची शक्ती दिलेली असते. ती खच्ची करू नका. उलट थोडेफार ऊन वारा पाऊस त्याला सोसू द्या ! तरच तो मजबूत बनेल. मग जीवनात कितीही वादळे आली तरी तो पालकांच्या (खत पाण्यावर) म्हणजेच भरोशावर जगणार नाही !
हेच खरे पालकत्व आहे !!
आपल्यापेक्षा हुशार, सुंदर आणि श्रीमंत आणि प्रसिध्द व्यक्तीबद्दल सर्वांनाच आकर्षण असते, गमतीने आपण त्यांचा हेवा करताना सुध्दा म्हणतो ना, . . . .’साला इसने कौनसी डेअरी का दुध पिया है, जनम के बाद, सबकुछ आबाद ही आबाद!’ गमतीचा भाग सोडा, पण खरंच प्रसिध्द, श्रीमंत आणि यशस्वी लोक कोणत्या डेअरीचे दुध पित असतील असा विचार करून पाहिला तर अंबानी, तेंडूलकर आणि बच्चन कुटूंबियाना रोज दूध पूरविणा-या भाग्यलक्ष्मी दूध डेअरीची माहिती मिळते. पुणे शहरापासून साठ किलोमीटर अंतरावर ही हायटेक डेअरी आहे. मंचर इथल्या या डेअरीचे नाव आहे ‘भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म’ आहे. पराग मिल्क फूडसचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र शहा हे या उद्योगाचे सर्वेसर्वा आहेत, त्यांच्याशी ‘युवर स्टोरी मराठी’ने चर्चा करून माहिती घेतली असता या हायटेक प्रकल्पाबाबत खूप काही रंजक आणि प्रेरणादायी गोष्टी समजतात ज्यातून देशात आजही दूध व्यवसायाला किती मोठा वाव आणि प्रतिष्ठा आहे याचे ज्ञान होते.
रात्री आकरा नंतर तुम्ही विविध भारतीची गाणी ऐकत झोप येण्याची वाट बघत राहता, त्यातंच टिव्ही चालु करुन नव्वदितील आई मिलन कि रात, लाल दुपट्टा मलमलका, उंगली मे अंगुटि अंगुटि मे नगिना, सो गया ये जहां, हि गाणी लागली कि एकटंच एक्साईट होउन तुमच्या आठवणी कुणाला तरी सांगु वाटतात, असं होत असेल तर तुम्ही पुढच्या पिढीत पदार्पण केले आहे समजावे आणि स्वतःला तरुण समजण्यापासुन दूर रहावे.
बाकि नवीन पंजाबी धांगडधिंगाण्या पेक्षा आंशी नव्वदीत रमणे कधीपण चांगलेच.
Flower and Balloon decoration -
Swami Samarth Paduka Pooja at Manchar
पण मूर्ती यांच्या दळभद्री वृत्तीने आता त्यास खीळ बसेल. त्यामुळे होणारे नुकसान एकटय़ा इन्फोसिसचे नाही. ते भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे आहे. पिढीच्या संघर्षांत पुढच्याऐवजी मागच्या पिढीचीच सरशी होत असेल तर ते या क्षेत्राला मागे नेणारे आहे. सिक्का यांच्या जाण्यामुळे इन्फोसिसचीच कोंडी होणार असून तिला ना कोणी प्रयोगशील प्रमुख भेटेल ना आता कंपनी बदलण्याचा प्रयत्न होईल. हे दुर्दैवी आहे. याची पुनरावृत्ती रोखायची असेल तर प्रत्येक क्षेत्रातील दुढ्ढाचार्याचे वारंवार मूर्तिभंजन व्हायला हवे. मूर्तिपूजेतून स्थितीवादीच तयार होतात. प्रगतीसाठी मूर्तिभंजनास पर्याय नाही.
बायकोच असते ग्रेट !!!
वाद तसा नेहमीचाच, विधान आहे थेट !
नवरा असला बेस्ट तरी बायकोच असते ग्रेट।
महिनाभर कष्ट करून , कमवून आणतो पगार
त्या पैशाला श्रध्देनं बायकोच देते आकार।
कमविलेल्या पैशांनीच जर भरले असते पोट
तर रात्रीच्या जेवणात वाढली असती हजाराची नोट।
आई बाप, भाऊ बहीण सोडून येते नवर-यासाठी
सगळं सोसून नांदत राहते उद्या लेकीच्या माहेरासाठी।
नवरा नावाच्या परीघाची व्यास असते बायको
संसाराचा ध्यास आणि श्वास असते बायको।
रखरखणा-या वाळवंटातील बायको सुंदर बेट
नवरा असला बेस्ट तरी बायकोच असते ग्रेट।।
लघुकथा ...
"अरे वा! आज चक्क गजरा!"
ती एकदम आश्चर्य चकित होऊन म्हणाली. सध्याच्या परिस्थितीत त्याच्याकडून एका साध्या कटाक्षासाठी तिला तरसायला लागत होतं. लग्नाला अनेक वर्षे उलटून गेलेल्या अनेक जोडप्यांसारखं त्यांच्यातल्या संवादाची पातळी आणि आपुलकी दोन्ही यथास्थता झाली होती. त्यामुळे ह्या छोटयाश्या गोष्टीने सुद्धा तिला खूप आनंद झाला ह्यात काही नवल नव्हते.
त्याने तिच्या हातात दिलेला गजरा घेतला आणि तिला म्हणाला,
" मागे फिर, माळून देतो." ती हसून वळली. त्याने हलकेच गजरा माळला. तिला खूप छान वाटलं.
लग्ना आधी तिला गजरा कधीच आवडायचा नाही. ती शक्यतो वेस्टर्न कपडे घालायची. त्यामुळे गजरा कधी फारसा माळला जायचा नाही. कधी सणा-समारंभाला आईने सांगितलं तर नाक मुरडायची ती.
पण लग्नानंतर अनेक गोष्टीं सोबत आवडी निवडीही बदलल्या. प्रेमाने सांगितलेल्या गोष्टी सक्तीच्या न वाटता नवऱ्याच्या प्रेमाखातर आवडू लागल्या. नंतर प्रेमाची व्याख्या बदलली किंवा priorities बदलल्या म्हणून सक्ती उरली. असो. ह्या क्षणी तरी छान वाटतंय ना! बास!
"काय बनवलंय आज जेवायला?" त्याने विचारलं.
"अजून सुरुवात नाही केलीये स्वयंपाकाला. काय बनवू सांग."
"काही नको. आपण आज बाहेर जाऊया जेवायला."
आणखी एक shock ! ह्याला आज झालंय तरी काय? इतका कसा आज राजा उदार झालाय?
लगेच तिचं दुसरं मन उसळून म्हणालं "काहीही काय? तो काय कंजूष नाहीये."
माहित आहे. पण आज काहीतरी घडलंय हे नक्की. स्वारी फारच खुशीत दिसत्ये आज. पण तो खुशीत तर आधीही असायचा. पण कधी आपल्याशी इतका चांगला वागला नाही.मग?
काय करावं त्याने? चांगला वागला तरी तुला प्रॉब्लेम, नाही वागला तरी तू उदास. करावं आय त्याने? सगळ्या गोष्टीत संशय घ्यायची मेली सवयच झालीये तुला! आता तो प्रियकरासारखा वागतोय तर तू का टिपिकल
बायको मोड मध्ये आहेस? ऐक ना त्याचं. जा तयार हो मस्तपैकी आणि दोघं छान एन्जॉय करा. नसती खुस्पटं काढत बसलीये!
बरं बरं. एवढं काही बोलायला नको. आज तो काही बोलत नाहीये तर तू मला ऐकवतोय्स का?
ती खुद्कन हसली. तिच्या दोन मनांमधली खडाजंगी संपली होती आणि तिला positive कौल का काय तो मिळाला होता.
तिने त्याच्या आवडीचा पिवळा आणि गुलाबी सलवार कमीझ घातला. केस विंचरून गजरा पुन्हा नीट माळला. दोघे कार ने निघाली. वाटेत तो अखंड गप्पा मारत होता. ती शांतपणे पण लक्ष देऊन ऐकत होती. थोडं अंतर गेल्यावर तिला राहवलं नाही. तिने विचारलंच.
"तुझा मूड खराब करायचा नाहीये मला. पण एक विचारू?"
"अगं विचार ना. माझा मूड आज कशानेही खराब होणार नाहीये." तो
"आज काय झालंय तुला? अचानक बाहेर जेवायला वगैरे?"
"चालणार आहे ना तुला? तुझी इच्छा नसेल तर आपण घरी जाऊया. मी काहीतरी पार्सल आणतो"
"नाही रे. माझी इच्छा नसायला काय झालंय? पण मघाशी घरी आल्यापासून मी बघतीये, तू खूप आनंदात आहेस. मला सारखं वाटतंय कि आज काहीतरी छान घडलंय तुझ्या सोबत. काय ते सांगितलंस तर त्याचा मलाही आनंदच होईल असं तुला नाही वाटत का?"
"काही नाही ग. आज आमच्या ऑफिस मध्ये "happiness unlimited " असा एक सेमिनार होता. त्या माणसाने एक कथा सांगितली. तशी काल्पनिकच म्हणायची. पण त्या कथेचा मी अजूनही विचार करतोय. त्याचा प्रत्येक शब्द माझ्या कानात घुमतोय. मनात फिरतोय. अजून."
"कुठली कथा ?"
तिला आश्चर्य वाटलं. अशी कुठली कथा असेल ह्याला एवढी आवडलेली. ह्याला इम्प्रेस करणं म्हणजे ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यापेक्षा महाकठीण काम. त्याला कधीच कुठली गोष्ट फार अशी आवडत नसे. तिच्या तर प्रत्येक गोष्टीत त्याने लग्नानंतर खोड काढली होती. असो.
तो सांगू लागला,
"फार पूर्वी म्हणे अरब देशात एक इसम रहायचा. त्याची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. साधा माणूस. पण नेहमी आनंदी आणि समाधानी. सतत चेहऱ्यावर हसू. एके दिवशी त्याला एक कप सापडतो. त्या कपात रडलं की अश्रुंचे मोती तयार होतात हे त्याला कळतं. पण ह्या पठ्ठ्याला कधी रडूच येत नसे. मग तो सतत उदास राहण्याचा प्रयत्न करू लागतो. दुःखाच्या ठिकाणी आवर्जून जाऊ लागतो. आणि त्या कपात रडून अश्रुंचे मोती तयार करू लागतो. हळूहळू त्याला ह्या मोत्यांच्या आणि त्यातून येणाऱ्या श्रीमंतीचा मोह होऊ लागतो. त्याचं लग्न होतं. बायकोवर प्रेम खुप. पण बायकोला आनंदी ठेवू शकत नाही. कारण स्वतःला आनंदी राहणं गरजेचं वाटत नसतं. शेवटी तो माणूस मोत्यांच्या डोंगरावर बसून आपण स्वतः संपवलेल्या बायकोच्या प्रेतावर रडतो असा त्या कथेचा शेवट आहे."
"बापरे" तिच्या अंगावर काटा आला.
" मी खूप विचार केला ह्या कथेचा. म्हटलं यार! आपण आनंद हवा, आनंद हवा म्हणून सगळी कडे भटकत असतो. पण जी माणसं आपली आहेत, आपल्या जवळ आहेत. त्यांच्या सुखात आनंद शोधणं किती सोप्पं आहे. मघाशी एका लहानश्या गजऱ्यानेही तू कित्ती खुश झालीस. तुझ्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मलाही खूप बरं वाटलं."
ती खुदकन हसली पुन्हा. आपला नवरा आपल्यावर मनापासून खूप प्रेम करतो आणि आपल्या सुखासाठी प्रयत्न करतो ही कल्पनाच अत्यंत सुखावणारी आणि positive आहे.
हॉटेल जवळ आल्यावर ती कार मधून उतरली. तो गाडी पार्क करून आला आणि दोघे जीना चढत असताना तिच्यातली बायको पुन्हा जागी झाली.
"काय रे. पण मला एक सांग. मोती मिळवण्यासाठी त्याला उदास राहायची काय गरज होती? रोज कांदा चिरला असता तर ढीगभर मोती मिळाले असते. उगाच त्या बिचाऱ्या बायकोला मारलं बावळाटाने."
तो हसू लागला आणि आश्चर्यचकितही झाला. हे त्याच्या डोक्यातही आलं नव्हतं. कसं येणार? असे उपाय बायकोलाच सुचू शकतात. त्या माणसाला पण हिच्या सारखी बायको असती तर ती वाचली असती.
कमाल आहे आपली. "हिच्याशी लग्न करून आपण फसलो" इथपासून "इतरांना पण हिच्या सारखी बायको मिळावी." इथपर्यंत आपण पोहोचलो. प्रगती आहे.
साभार : आतंरजाल
" आत येऊ का ??
" रविवारी सकाळी शेजारचे काका यांच्याकडे आम्ही चहा घेत असताना एक तरुण आला " आम्ही एक सर्व्हे करतोय..
तुम्ही तुमचं #देशप्रेम कसं व्यक्त करता??...
तुम्हाला काही प्रश्न विचारीन त्याची उत्तरं तुम्ही मोजक्या शब्दात द्या... " काका तयार झाले आणि तो तरुण त्याचे प्रश्न विचारू लागला...
" तुम्ही १५ ऑगस्ट ला खाली उतरून राष्ट्रीय गीत म्हणता का ? -
" #नाही " - काका
" तुम्ही घरात, तुमच्या गाडीवर असा कुठे झेंडा लावता का ? " -
" #कधीच_नाही " - काका
" तुम्ही तुमच्या शर्टावर,अंगाखांद्यावर कुठे झेंडा लावता का " -
" #अजिबात_नाही " - काका .. तो तरुण जरासा वैतागला आहे असं एकंदरीत दिसत होतं...
"अहो तुम्ही यातलं काहीच करत नाही...मग तुम्ही तुमचं राष्ट्रप्रेम कशाप्रकारे दाखवता "" - तो तरुण जरासा वैतागून म्हणाला...
" #मी_१६_ऑगस्ट_ला_रस्त्यावरून_तुमच्या_देशप्रेमी #लोकांनी_फेकलेले_झेंडे_उचलून #घरी_घेऊन_येतो #आणि_त्यांचं_विसर्जन_करतो."
- काका तितक्याच शांतपणे म्हणाले ...
तो तरुण गहिवरला...
हातातलं पेन- कागद खाली ठेवून देशपांडे काकांना वाकून नमस्कार केला...
आणि फोन लावून पलीकडे कोणाला तरी म्हणाला " #आपल्याला_आज_खरा_देशप्रेमी_सापडला "
#असंच_अनुकरण_तुमच्या_सर्वांकडुन_अपेक्षित_आहे.
* #राष्ट्र_ध्वजाचा_मान_राखा!!
🙏🙏🙏🙏
Celebrate this Independence Day with balloon decorations at your shop office or workplace. Sohla events offers beautiful balloon and ribbon decorations with new innovative ideas for your shop and offices. Call for details about our decorations. Sohla Events 9850983037
SOHLA EVENTS offers attractive and exciting packages for your all celebrations like Birthdays, anniversaries and baby shower. We also helps you make your Function memorable. for more information call 9850983037.
Balloon Decoration by SOHLA EVENTS
Baby shower package
Samarth Garden
Narayangaon
410504
Be the first to know and let us send you an email when Sohla Event Management Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Send a message to Sohla Event Management Pune: