SanGaur

SanGaur सानगौरतर्फे होणाऱ्या उपक्रमांची माह?
(1)

फेसबुकवर आम्हा दोघी मैत्रिणींना लोकांचं भरभरून प्रेम मिळालं आणि आजही मिळत आहे. 'तुमचं लिखाण आवडतं', 'आम्हाला तुमच्या पोस्टशी रिलेट करता येतं', 'तुमच्या खुसखुशीत पोस्ट्स मुळे आमचे ताणतणाव दूर होतात', 'आजची पोस्ट वाचली आणि अर्धा तास फक्त हसत होतो मी' अशा अनेक प्रतिक्रियांमुळे आम्हाला अधिकाधिक लिहायला प्रोत्साहन मिळालं. जेव्हा वाचकांनी, 'आम्हाला तुम्हा दोघींना भेटायचं आहे', 'तुमच्याशी गप्पा मारायच्या

आहेत' असं सांगितलं तेव्हा आम्ही ठरवलं की सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्मवर भेटलेल्या या मित्र मैत्रिणींसाठी आपण काहीतरी वेगवेगळे उपक्रम करत राहू. त्यायोगे आपण त्यांच्याशी अधिकाधिक जोडलेले राहू आणि आम्हालाही आमच्या कल्पकतेला वाव देऊन नवनवीन प्रयोग करून नव्या गोष्टी शिकता येतील.

नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर ऑक्टोबर २०२१ रोजी आम्ही अशा उपक्रमांना सुरुवात केली. या उपक्रमांना देखील सगळ्यांनी उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद दिला.

म्हणूनच जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि फक्त सानगौर तर्फे होणाऱ्या उपक्रमांची माहिती सर्वांना एकाच ठिकाणी आणि सलग मिळावी यासाठी सानगौरच्या पेजची निर्मिती केली.

आशा आहे यालाही तुम्ही उत्तम प्रतिसाद द्याल.

धन्यवाद
सानिका वाडेकर आणि गौरी ब्रह्मे

04/05/2022
१ मे ला पुण्यात होणाऱ्या अक्षरधन समूहाच्या संमेलनाची रूपरेषा. रजिस्ट्रेशन सुरू आहेत.  त्वरित संपर्क साधावा.
21/04/2022

१ मे ला पुण्यात होणाऱ्या अक्षरधन समूहाच्या संमेलनाची रूपरेषा. रजिस्ट्रेशन सुरू आहेत. त्वरित संपर्क साधावा.

 #संमेलन अरे, संमेलनाची काही तयारी वगैरे सुरू आहे की नाही? की थेट १ मे लाच सर्व काही समजणार? कार्यक्रम सर्वांना आवडेल आण...
12/04/2022

#संमेलन

अरे, संमेलनाची काही तयारी वगैरे सुरू आहे की नाही? की थेट १ मे लाच सर्व काही समजणार? कार्यक्रम सर्वांना आवडेल आणि रंगतदार होण्यासाठी काही मेहनत घेतायत की नाही? की सर्व काही सिक्रेट?
मित्रहो, असे प्रश्न तुमच्या मनात येत असतील तर सर्व शंका काढून टाका. संमेलन उत्तम होण्यासाठी आमचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. अनेक लोकांशी बोलत आहोत, चर्चा करत आहोत. काल कार्यक्रमाच्या आखणी संदर्भात काही समूहसदस्यांना भेटलो आणि आमचा हुरूप अजूनच वाढला आहे. कार्यक्रम नक्की छान होणार आहे. तुम्ही नोंदणी केलीत की नाही? नसेल तर आजच रजिस्टर करा!भेटू या १ मे ला!

05/04/2022

#सानगौर
#काही_महत्वाचं

छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी आपलेच काय पण आपल्या भावी पिढीचे देखील बाहू स्फुरण पावतात...
महाराजांचं कर्तृत्व दाखवण्यासाठी आपण त्यांना रायगडावर घेऊन जातो खरे पण ताक पिणं, भजी, पिठलं भाकरी खाणं आणि गडावर मुलांसह रानोमाळ भटकून परत येणं या व्यतिरिक्त आपण काही करत नाही. आपल्याकडून महाराजांची माहिती मुलांपर्यंत पोहोचत नाही. कारण शिवाजी महाराजांबद्दल भावना व्यक्त करताना शब्द तोकडे पडतात. आपण हळहळतो. वाटतं की, 'अरे, गडावर तर जाऊन आलो पण महाराजांचं कर्तृत्व एवढं मोठं की मुलांना माहिती सांगताना आपल्याला ते शब्दात मांडताच आलं नाही. किंबहुना शाळेतल्या पाठयपुस्तकात जेवढा इतिहास शिकला त्यानंतर आपला काही कनेक्टच राहिला नाही इतिहास या विषयाशी.'

अशावेळी साहित्यिक, कलाकार, कवी, लेखक, नाटककार, अभिनेते, गायक अशी सृजनशील मंडळी आपल्या मदतीला येतात. महाराज म्हणजे फक्त युद्ध नव्हे. तर...
आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील। ...शिवकल्याण राजा ।।
या गाण्यातून महाराजांची नेमकी ओळख आपल्याला होते. अशाप्रकारे आपल्या कलेतून हे कलाकार जेव्हा 'महाराज' आपल्यासमोर सादर करतात तेव्हा ते मनाला भिडतात, स्मृतीत रेंगाळत राहतात.

हे फक्त शब्दांकन नव्हे. हा माझा अनुभव आहे. माझ्या मुलाला अनेकदा आम्ही रायगडावर घेऊन गेलो पण ती सर्वसाधारण ट्रिप ठरली. पण एकदा 3 एप्रिल रोजी, म्हणजेच महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी एका संस्थेने आयोजित केलेल्या ट्रेकमध्ये जेव्हा माझा मुलगा जाऊन आला तेव्हाच्या त्याच्या अनुभवात आणि आधीच्या अनुभवात जमीन अस्मानाचा फरक होता. ती रायगड ट्रिप माझ्या मुलासाठी अविस्मरणीय ठरली.

तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की तशी संधी पुन्हा आली आहे. रायगडावर प्रत्यक्ष महाराजांचं दर्शन घ्या, आपल्या मुलांना देखील ते दैदिप्यमान क्षण अनुभवायला घेऊन जा.

सुदीप आठवले आयोजित करत आहेत -
रायगड दर्शन सहल
१८-१९ एप्रिल २०२२
रायगडावरील महत्वाच्या वास्तूंना भेट, पाचाड येथे रात्री मुक्काम, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या समाधी स्थळाला भेट (भोजन, नाश्ता समाविष्ट)
सहल खर्च ३०००/- ₹ फक्त

उत्तम कलाकारांचा संच सादर करेल, 'रायगडाला जेव्हा जाग येते...'
हा शिवकालीन घटनांचा अनुभव जरूर घ्या. (विनामूल्य)

संपर्क -
Sandhya Oka
9833247387
सुदीप आठवले
9082429129/ 8108177322

मुलांच्या उन्हाळी सुटीच्या सुरुवातीलाच आलेली ही संधी दवडू नका.

जास्तीतजास्त शेअर करून ही माहिती सर्व शिवप्रेमींपर्यंत पोहोचवा.

धन्यवाद 🙏🏻

 #सानगौर #काही_महत्वाचंछत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी आपलेच काय पण आपल्या भावी पिढीचे देखील बाहू स्फु...
05/04/2022

#सानगौर
#काही_महत्वाचं

छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी आपलेच काय पण आपल्या भावी पिढीचे देखील बाहू स्फुरण पावतात...
महाराजांचं कर्तृत्व दाखवण्यासाठी आपण त्यांना रायगडावर घेऊन जातो खरे पण ताक पिणं, भजी, पिठलं भाकरी खाणं आणि गडावर मुलांसह रानोमाळ भटकून परत येणं या व्यतिरिक्त आपण काही करत नाही. आपल्याकडून महाराजांची माहिती मुलांपर्यंत पोहोचत नाही. कारण शिवाजी महाराजांबद्दल भावना व्यक्त करताना शब्द तोकडे पडतात. आपण हळहळतो. वाटतं की, 'अरे, गडावर तर जाऊन आलो पण महाराजांचं कर्तृत्व एवढं मोठं की मुलांना माहिती सांगताना आपल्याला ते शब्दात मांडताच आलं नाही. किंबहुना शाळेतल्या पाठयपुस्तकात जेवढा इतिहास शिकला त्यानंतर आपला काही कनेक्टच राहिला नाही इतिहास या विषयाशी.'

अशावेळी साहित्यिक, कलाकार, कवी, लेखक, नाटककार, अभिनेते, गायक अशी सृजनशील मंडळी आपल्या मदतीला येतात. महाराज म्हणजे फक्त युद्ध नव्हे. तर...
आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील। ...शिवकल्याण राजा ।।
या गाण्यातून महाराजांची नेमकी ओळख आपल्याला होते. अशाप्रकारे आपल्या कलेतून हे कलाकार जेव्हा 'महाराज' आपल्यासमोर सादर करतात तेव्हा ते मनाला भिडतात, स्मृतीत रेंगाळत राहतात.

हे फक्त शब्दांकन नव्हे. हा माझा अनुभव आहे. माझ्या मुलाला अनेकदा आम्ही रायगडावर घेऊन गेलो पण ती सर्वसाधारण ट्रिप ठरली. पण एकदा 3 एप्रिल रोजी, म्हणजेच महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी एका संस्थेने आयोजित केलेल्या ट्रेकमध्ये जेव्हा माझा मुलगा जाऊन आला तेव्हाच्या त्याच्या अनुभवात आणि आधीच्या अनुभवात जमीन अस्मानाचा फरक होता. ती रायगड ट्रिप माझ्या मुलासाठी अविस्मरणीय ठरली.

तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की तशी संधी पुन्हा आली आहे. रायगडावर प्रत्यक्ष महाराजांचं दर्शन घ्या, आपल्या मुलांना देखील ते दैदिप्यमान क्षण अनुभवायला घेऊन जा.

सुदीप आठवले आयोजित करत आहेत -
रायगड दर्शन सहल
१८-१९ एप्रिल २०२२
रायगडावरील महत्वाच्या वास्तूंना भेट, पाचाड येथे रात्री मुक्काम, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या समाधी स्थळाला भेट (भोजन, नाश्ता समाविष्ट)
सहल खर्च ३०००/- ₹ फक्त

संपर्क -
Sandhya Oka
9833247387

उत्तम कलाकारांचा संच सादर करेल, 'रायगडाला जेव्हा जाग येते...' (विनामूल्य)

मुलांच्या उन्हाळी सुटीच्या सुरुवातीलाच आलेली ही संधी दवडू नका.

जास्तीतजास्त शेअर करून ही माहिती सर्व शिवप्रेमींपर्यंत पोहोचवा.

धन्यवाद 🙏🏻

02/04/2022
।। श्री ।।चैत्र प्रतिपदा-गुढी पाडवा-नव वर्षारंभ 🚩हे हिंदू नववर्ष तुम्हांला आणि तुमच्या कुटुंबियांना सुखाचे,समाधानाचे,आनं...
02/04/2022

।। श्री ।।

चैत्र प्रतिपदा-गुढी पाडवा-नव वर्षारंभ 🚩
हे हिंदू नववर्ष तुम्हांला आणि तुमच्या कुटुंबियांना सुखाचे,समाधानाचे,आनंदाचे,
समृध्दीचे,भरभराटीचे,उत्साहाचे, उत्तम आरोग्याचे,चैतन्याचे जावो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!🙏🏻
सानगौर

 #ओळखपाळख #अक्षरधन_पहिले_संमेलन #सानगौरअक्षरधन हा साहित्याला वाहून घेतलेला, राजकारण, भेदभाव, गटबाजी याचा स्पर्श न झालेला...
26/03/2022

#ओळखपाळख
#अक्षरधन_पहिले_संमेलन
#सानगौर

अक्षरधन हा साहित्याला वाहून घेतलेला, राजकारण, भेदभाव, गटबाजी याचा स्पर्श न झालेला समूह. इथले सभासद देखील डिसेंट आणि प्रगल्भ. सगळ्या सभासदांना एकत्र आणण्याच्या, संमेलन घेण्याच्या चर्चा आम्ही अडमिन्स सतत करत असू. पण कार्यमग्नतेमुळे ते काही प्रत्यक्षात उतरत नव्हते.

म्हणूनच ही जबाबदारी सर्व अडमिन्सनी मिळून 'सानगौर'ला म्हणजेच मला आणि गौरीला दिली. आम्हाला देखील हे काम करताना खूप मजा येते आहे कारण इथले सभासद देखील उत्साहाने प्रत्येक उपक्रमात सहभागी होत आहेत.

संमेलनात आईस ब्रेकिंग गेम, पुस्तक प्रकाशन, नृत्य, गायन, वादन, अभिवाचन, काव्यरंग, छोटे वर्कशॉप्स, सहभोजन असे अनेक छोटेखानी कार्यक्रम असतील. हा सोहळा सर्वसमावेशक, मनोरंजक, नवीन छान ओळखी करून देणारा असेल यासाठी आम्ही अडमिन्सच्या मदतीने आटोकाट प्रयत्न करतो आहोत. तुमची उपस्थिती आणि सहभाग प्रार्थनीय आहे.

बऱ्याच जणांनी नोंदणी केली आहेच. आपणही संमेलनात अवश्य यावे हे आम्हा सर्वांकडून आग्रहाचे आमंत्रण.

धन्यवाद 🙏🏻

अक्षरधन साहित्यस्नेह संमेलन
१ मे २०२२ रोजी रविवारी
महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर
शिवसमर्थ हॉल,
एम आय टी कॉलेज जवळ,
पौड रोड, पुणे येथे
११ ते ३ या वेळेत होईल.
नोंदणी फी ₹७००/-

(काल संमेलनाच्या कामांसाठी भेटलो तेव्हाचा फोटो 😀)

25/03/2022

#सानगौर
रानजाई
सानगौर ने केली रानजाईला जाण्याची अभिनव कल्पना
फेसबुक वर कॉमेंट्स चा पाऊस पडला ," मला न्या मला न्या "
त्यात नंबर लागला काहीच जणींचा ,
दिवस ठरला रविवार ,१२ डिसेंबरचा

रविवारी सकाळी निघाल्या सगळ्या नीलपऱ्या ,
एक दिवस नवऱ्यावर सोपवून सगळ्या घरच्या जबाबदाऱ्या

प्रवास होता फक्त तास
प्रवासातच घेतला सगळ्यांनी मोकळा श्वास

रानजाईला पोहोचताच स्वागत झाले कोकम सरबताने
सगळ्यांनी ओळख करुन दिली आपापल्या परीने
ओळख करुन द्यायची होती फक्त ३ वाक्यात
खोटे वाक्य कुठले ?? ओळखा पाहू यात

मग खाल्ला मस्त चॉकलेट केक स्वादिष्ट
कॅलरी जाळायला घ्यायला लागणार थोडेसे कष्ट

goggle ,टोपी मोबाईल घेऊन झाले सगळे walking ला तयार
सानिका आणि गौरीने घेतला पुढाकार

चालतानाही सगळे बागडत होते स्वच्छंद
कोणावरही नव्हते कसलेच निर्बंध

'अग इथे बघा , एक कॅन्डीड घेऊ ' असं म्हणत झालं भरपूर फोटो सेशन
'आज भाजी कुठली करु ??' चे कोणालाच नव्हते टेन्शन

फोटो झाले थेट रस्त्यावरही बसून बिसून ,छान pose देऊन ,
झाडावरच्या चिंचा तोडताना सगळ्यांच्या चेहेऱ्यावर
आनंद वाहत होता ओसंडून

दुपारच्या जेवणात होते ठेचा ,पिठलं आणि
मस्त गरमागरम भाकरी
एकदा वाटून गेलं आलोय की काय माहेरी

आयत्या जेवणावर सगळ्यांनी मारला ताव
उरलेला अन्न काढून ठेवा , टेबल पुसा आज कसलंच काम नव्हतं ना राव

दुपारनंतर रानजाईतली उन्हं ही जरा विसावली
सगळी मंडळी जरा सुस्तावली

मग झाले थोडे करमणुकीचे कार्यक्रम , गेम आणि विचारांचे आदानप्रदान
मैत्रिणी आहेत एक से एक बढकर छान

मग रंगत आणली चहा आणि कांदा भज्यांनी
सांगता झाली सुंदर सुंदर चारोळ्यांनी

मग निघाले सगळे माघारी
घेऊन रानजाईचा ठेवा आणि आनंदाची शिदोरी

सानगौर चे पुढील प्रोजेक्ट सुद्धा असेच यशस्वी होऊदेत अशीच इच्छा
रानजाई ग्रुप च्या वतीने
खूप खूप शुभेच्छा !
©सायली वझे पानसे

15/03/2022

मित्रों,
सानगौरचा नवीन उपक्रम
यावेळी मैत्रिणींबरोबर तुम्हीही सहभागी होऊ शकता. अर्थातच कार्यक्रम हटके असेल आणि तुम्हा सगळ्यांना आवडेल...
अधिक माहितीसाठी आमच्या पोस्ट्स वाचत रहा. ☺️🙏🏻

सोशल मीडियाने आपल्या आयुष्यात क्रांती केली, काही गोष्टी एका क्लिकवर साध्य केल्या, जगभरातल्या लोकांशी एका क्षणात आपण जोडल...
15/03/2022

सोशल मीडियाने आपल्या आयुष्यात क्रांती केली, काही गोष्टी एका क्लिकवर साध्य केल्या, जगभरातल्या लोकांशी एका क्षणात आपण जोडले गेलो. त्याचबरोबर फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मने आपल्याला काही चांगल्या सवयीही लावल्या. सर्वात चांगली सवय लावली ती म्हणजे वाचनाची आणि मराठीत लिखाणाची. फेसबुकवर अनेकांनी मराठीत लिहायला सुरुवात होऊन तशी सहासात वर्ष झालीत. इथे लिखाण वाचनाचे अनेक ग्रुप्सही निघाले. अक्षरधन हा सर्वस्वी मराठी साहित्य, लिखाण आणि वाचनाला वाहिलेला फेसबुक ग्रुप गेली ४ वर्ष कार्यरत आहे. या ग्रुपवर उत्तम आणि दर्जेदार लिखाण वाचायला मिळतं, विचारांची देवाणघेवाण होते. वादविवाद, राजकारण याचा लवलेशही नसलेला हा गृप नवनवीन लेखकांना उत्तमोत्तम लिहायला तर प्रोत्साहित करतोच तसंच वाचकांसाठी इथे विविध लेखमालांची, कथाकवितांची पर्वणी आहे. या ग्रुपवर आम्ही (सानगौर) व अक्षरधन ग्रुप येत्या १ मे रोजी एक छानसा (ऑफलाईन) कार्यक्रम घेऊन येत आहोत. कसला कार्यक्रम? कुठे? याचे डिटेल्स लवकरच देऊ. तूर्तास हा ग्रुप जॉईन करा आणि लिहायला वाचायला सुरुवात करा. लिंक https://www.facebook.com/groups/557041041371574/

अधिक माहितीसाठी ग्रुपवरची ही pinned post जरूर वाचा.
लिंक https://www.facebook.com/groups/557041041371574/permalink/1254096754999329/

#सानगौर

11/03/2022
We are on roll! Come visit us in Coep college. We are here till 9pm!
08/03/2022

We are on roll! Come visit us in Coep college. We are here till 9pm!

सानगौर तर्फे Women's day च्या शुभेच्छा!🍁
08/03/2022

सानगौर तर्फे Women's day च्या शुभेच्छा!🍁

Join us tomorrow at 4pm!
07/03/2022

Join us tomorrow at 4pm!

06/03/2022

Celebrate Women's Day with us north campus on 8th March 22 from 4pm onwards
💃💃💃👸👸

सानगौरतर्फे आम्ही दरवेळी नवनवीन उपक्रम करत असतो. मागच्या तिन्ही उपक्रमांना आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला, त्यानिमित्तान...
06/03/2022

सानगौरतर्फे आम्ही दरवेळी नवनवीन उपक्रम करत असतो. मागच्या तिन्ही उपक्रमांना आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला, त्यानिमित्ताने भरपूर शिकायला मिळालं, समाजमाध्यमांचा योग्य वापर करायला आम्ही शिकलो, खूप चांगली माणसं भेटली. एका चांगल्या गोष्टीतून आपोआप दुसऱ्या चांगल्या गोष्टीची निर्मिती होत असते. अशीच एक उत्तम संधी या महिन्यात आम्हाला चालून आली. येत्या ८ मार्चला पुण्याच्या सीओइपी (College of engineering Pune) कॉलेजमध्ये "Women's day" निमित्त अनेक कार्यक्रम होणार आहेत. यात एक Mini shopping mall ही असणार आहे, ज्यात अनेक नावीन्यपूर्ण वस्तूंचे स्टॉल्स असणार आहेत. या Fleamarket मध्ये सानगौरचाही एक स्टॉल असणार आहे. स्टॉलवर तुम्हाला आवडतील अशा अनेक वस्तू असणार आहेत. आम्हाला तुम्हा मैत्रिणींशी गप्पा मारायला, Women's day सेलिब्रेट करायला, शॉपिंग करायला आवडेल. येताय ना मग ८ तारखेला संध्याकाळी? अवश्य या! भेटू!
स्थळ : North campus, Coep कॉलेज, पुणे
वेळ : संध्याकाळी ४ ते ९
#सानगौर

Coming up with something interesting! Stay tuned!
05/03/2022

Coming up with something interesting! Stay tuned!

18/02/2022

#सानगौर
#घटस्थापना_२०२१
#शुभारंभ

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

असच एकदा आम्ही दोघी गप्पा मारत असताना कुठे काय चांगलं मिळतं, कोण उत्तम ग्राहक सेवा देतं हे एकमेकींना सांगत होतो. या गप्पांमधूनच गौरीला अशी कल्पना सुचली की आपल्याला माहिती असलेल्या चांगल्या व्यावसायिकांबद्दल आपण सगळ्यांनाच सांगितलं तर?

या चांगल्या कामाचा शुभारंभ घटस्थापनेच्या दिवशी करायचा असं आमचं ठरलं आणि मग नवरात्र आहे तर महिला व्यावसायिकांची ओळख करून द्यावी ही अजून एक नवी कल्पना डोक्यात आली. असंही म्हणतातच ना! 'स्त्री ही नुसतंच प्रेमाचं, मायेचं प्रतीक नव्हे तर शक्ती आणि धडाडीचंही रूप असते.' म्हणून अशाच धडाडीच्या दहा स्त्री उद्योजिकांना आम्ही गेल्या काही दिवसांत भेटलो, त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. सर्वांनी आम्हाला त्यांच्या आयुष्याबद्दल, व्यवसायाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल खूप काही सांगितलं. या सगळ्या महिलांनी शून्यापासून सुरुवात करून आपापला व्यवसाय स्वबळावर वृद्धिंगत केला आहे. तो फिर उनको एनकरेज करना तो बनता है बॉस!

मग आम्ही आमच्या लेखन कौशल्याचा आणि कल्पकतेचा वापर करून आम्हाला आवडलेल्या व्यावसायिकांची माहिती द्यायचं ठरवलं. प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळी कल्पना लढवून तुमच्यापर्यंत यांची गाथा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. हा आमचा प्रयत्न आणि आमची कल्पना तुम्हाला आवडेल असं अगदी मनापासून वाटतंय. तरीही काही चुकलं तर नक्की सांगा. तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत.

Gauri आणि Sanika 👭🏻🙏🏻🙏🏻

14/02/2022
All set!
13/02/2022

All set!

13/02/2022

#सानगौर
#भेटीगाठी
#मीच_का_करू_तडजोड?

माझं शिक्षण पूर्ण झालं. नोकरी करत होते. मोठ्या बहिणीचं लग्न झालं आणि आईने मला लग्नाचं विचारलं. लग्न करून संसार थाटणे हे तर माझं स्वप्नच होतं. 😜🙈 त्यामुळे मी 'हो' म्हटलं आणि मुलाबाबत तुझ्या काय अपेक्षा आहेत?' असं विचारल्या बरोब्बर लगेच, "त्याने कमवावं आणि मी उत्तम संसार करेन." असं कॉन्फिडेंटली सांगितलं होतं मी आईला.

माझी आई ग्रॅज्युएट, सरकारी नोकरी करणारी आणि व्यवहार चतुर होती. ती म्हणाली, "हल्ली एकाच्या कमाईत घर चालवणं मुश्किल असतं. तसा मुलगा तुला मिळाला तर उत्तमच आहे. पण समजा, लग्नानंतर वेळ पडली तर नोकरी करण्याची मानसिक तयारी ठेव."

हे बोलून तिने नामांकित विवाह संस्थेत माझं नाव नोंदवलं. माझ्या मनासारखं स्थळ लगेच चालून आलं. प्रकाशन व्यवसाय असलेला, पुण्यातला सेल्फ मेड मुलगा. दोन भेटीतच पोरात दम आहे हे मी जोखलं आणि त्याच्या सोबत बोहल्यावर चढले.

घरापासून जवळच आमचं ऑफिस आहे. नवीन असताना हॉटेलिंग आणि भटकंती यामुळे सांसारिक कामं करायची वेळ माझ्यावर फारशी आलीच नाही. ऑफिसमध्ये एक डीटीपी ऑपरेटर मॅडम, एक मुलगा, मी आणि वाडेकर असं एकत्र मिळून काम करत होतो.

लग्नानंतरची दोन वर्ष भुर्रर्रकन उडून गेली. तिसऱ्या वर्षी ऑफिसमध्ये कमी काम होतं. ऑपरेटर मॅडम ते काम करून टाकत. मी आणि वाडेकर अक्षरशः हातावर हात ठेवून बसत असू. वाडेकरांना व्यवसायातील अशा चढउतारांची सवय असावी. आमचं आख्खं कुलकर्णी खानदान सरकारी नोकरीत असल्यामुळे, मला दर महिना बँकेत जमा होणाऱ्या पैशाची निश्चिंतता सवयीची होती. काम नाही आणि त्या अनुषंगाने पैसेही मिळणार नाहीत याचं मला भयानक टेन्शन आलं.
मी वाडेकरांना विचारलं की, "आता आपण काय करायचं? आपल्याकडे काम कमी आहे तर आपण सगळे खर्च कसे भागवणार?"
तेव्हाच आम्ही नवीन घर घेण्याचा देखील विचार करत होतो.
वाडेकरांनी मला समजावलं, "अशी सिच्युएशन येत असते अधून मधून बिझिनेस मध्ये. अशावेळी आपले खर्च कमी करायचे."
पण मला धीर नव्हता. मी विचारलं, "आणि नाहीच आलं काम तर?"
"नाही आलं तर नाही. आपण प्रयत्न करू शकतो, अजून काय करणार?" असं काहीतरी बोलून वाडेकरांनी वेळ मारून नेली.

एव्हाना घरातली कामं न संपणारी आणि कंटाळवाणी असतात याचा साक्षात्कार होऊन संसार करायचा माझा हुरूप देखील मावळला होता. 😅
त्यामुळे दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्रात आलेल्या एका चांगल्या संस्थेची जाहिरात पाहून अर्ज केला आणि नोकरी पटकावली. नोकरी सुरू केल्यानंतर सहाच महिन्यांनी आमच्याकडे एक मोठं काम आलं आणि नोकरी सांभाळून, रात्रंदिवस अव्याहत काम करून, काही कामं आऊट सोर्स करून आम्ही ते पूर्ण केलं.

व्यवसाय उत्तम चालू आहे हे वर्षभरात उमजलं. तरीही मी नोकरी सोडली नाही. महिन्याच्या महिन्याला मिळणारा चांगला पगार (वाडेकरांच्या ऑफिसमध्ये पगार नव्हता. महागड्या भेटी खूप मिळाल्या. पण स्वतःच्या कमाईचं वेगळंच समाधान असतं.) घरी काम करण्यासाठी मिळालेले उत्तम मदतनीस जे बिनबोभाट सगळी कामं करत होते, नोकरीतील चांगले सहकारी आणि तिथलं उत्तम वातावरण या सगळ्या अनुकूलतेमुळे मी चक्क १४ वर्ष नोकरी करत घरच्या व्यवसायात देखील मदत केली.

नोकरी करण्याची अपेक्षा नसलेलं स्थळ शोधणारी मी, 'माझा संसार अडचणीत येऊ शकतो' अशी नुसती शंका आल्यावर सैरभैर होऊन नोकरीसाठी घराबाहेर पडले आणि नोकरी केली.

तसच आपल्याला चूल आणि मूल सांभाळायला आवडेल असं समजणारी मी, प्रत्यक्षात संसारात पडल्यावर दोन वर्षात त्या न संपणाऱ्या कामांना कंटाळले.

अशाच प्रकारे माझ्या काही इंजिनियर, द्वीपदवीधर मैत्रिणींनी 'लग्नानंतर आपलं करियर सोडायचं नाही असं ठामपणे ठरवलं असलं तरी अपत्य जन्मानंतर त्यांचा तो निश्चय डळमळीत झाला. सगळ्यांनीच आपल्या अटी, अपेक्षा बासनात गुंडाळून ठेवल्या आणि संसारात आपल्या प्रायोरिटीज आपल्या सोयीनुसार ठरवल्या.

सांगण्याचा मुद्दा हा की, आयुष्य असं फुटपट्टीवर मोजता येत नाही. एकदा संसारात पडल्यावर कुटुंबियांच्या आनंदासाठी, नवरा असो वा बायको, दोघेही राबतातच आणि अनेक तडजोडी आनंदाने करतातच.

त्यामुळे, कितीही अस्थिर, अनिश्चित परिस्थिती आली तरी आपण एकमेकांच्या बरोबर आनंदाने सहजीवन व्यतीत करू शकतो ना? एकमेकांना पूरक ठरतोय ना? इतकंच बघा. जोडीदार निवडताना, त्याच्याबद्दलच्या अपेक्षा ठरवताना फार काटेकोरपणा करू नका.

आयुष्यात अनेक चांगल्या संधी येतात, कल्पनेतही विचार केला नसेल अशा अडचणी देखील येतात. पण आहे ते आयुष्य निरसपणे, एकलकोंडेपणाने काढण्यापेक्षा; साथसोबत घेऊन दोघांमधलं नातं फुलवत स्वप्नवत प्रवास होऊ शकतो हे लक्षात ठेवा.

तुम्हाला उत्तम जोडीदार मिळतोच आहे... प्रतीक्षा संपून आता आनंदी सहजीवनाची सुरुवात तुम्ही करताच आहात... त्यासाठी मेसेंजरमध्ये संपर्क करून आमची मदत जरूर घ्या.

 #सानगौर #भेटीगाठी #लग्नकर्तव्य आयोजित करत आहे, विवाहेच्छुक ब्राह्मण मुलामुलींच्या भेटीगाठीचा, अनौपचारिक गप्पांचा आणि सह...
12/02/2022

#सानगौर

#भेटीगाठी

#लग्नकर्तव्य आयोजित करत आहे, विवाहेच्छुक ब्राह्मण मुलामुलींच्या भेटीगाठीचा, अनौपचारिक गप्पांचा आणि सहभोजनाचा कार्यक्रम.

(प्रथम वर, प्रथम वधू, घटस्फोटीत, विधुर, विधवा, सापत्य, विनापत्य अशा सर्व वयोगटातील विवाहेच्छुकांसाठी एक आगळा वेगळा उपक्रम)

रविवार, दिनांक १३ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ५ ते ९
विष्णुजी की रसोई,
म्हात्रे पुलाजवळ, पुणे येथे

प्रवेश मूल्य ₹५००/- फक्त
9922941231
या नंबरवर अर्चना खांबेटे यांना
Gpay करून
आपल्या पेमेंटचा फोटो व आपले पूर्ण नाव
अश्विनी भाटवडेकर
9527447420
यांच्या नंबरवर व्हाट्सअप करावे
तसेच त्यांना फोन करून आपले नाव नोंदवून घ्यावे.

#मोजक्याच_जागा_उपलब्ध

संपर्क -
अश्विनी भाटवडेकर -9527447420
श्रेया रानडे - 9822478742
लग्नकर्तव्य, पुणे

11/02/2022

#सानगौर
#भेटीगाठी

आता फक्त शेवटचे तीन दिवस सानगौरचा 'भेटीगाठी' हा उपक्रम असेल. उदंड प्रतिसाद मिळाला. आता रविवारी होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीत बिझी आहोत.

यानंतर आमच्या व्हाट्सअप, मेसेंजरला मेसेजेसचा पूर येणार नाही, फोन घणघणणार नाहीत की या उपक्रमाची माहिती देऊन तोंड दुखणार नाही.

पण खूप एन्जॉय केला हा उपक्रम. या निमित्ताने विवाहेच्छुक मुलामुलींशी आणि त्यांच्या पालकांशी भरपूर गप्पा झाल्या, चांगली माणसं भेटली.
☺️🙏🏻

विवाहेच्छुकांनी मेसेंजरमध्ये किंवा आमच्या सानगौर पेजवरून संपर्क करा.

https://www.facebook.com/SanGaur-103915088884829/

 #सानगौर #व्हॅलेंटाईन_रोज_डे 🌹किती व्हॅलेंटाईन आले आणि तसेच रिते गेले. ना कोणाला गुलाब दिले, ना कोणाकडून घेतले! माझ्या म...
11/02/2022

#सानगौर
#व्हॅलेंटाईन_रोज_डे 🌹

किती व्हॅलेंटाईन आले आणि तसेच रिते गेले. ना कोणाला गुलाब दिले, ना कोणाकडून घेतले! माझ्या मनातला राजकुमार/ राजकुमारी भेटलेच नाहीत. कालही माझा साथीदार माझ्याबरोबर नव्हता आणि आजही नाहीये.

'असा काय फरक पडतो हो नाही झालं लग्न तर?' असा प्रश्न लग्न झालेल्या लोकांना विचारायची चूक करू नका बरं! 😉 कारण, लग्न न होणं आणि आपला जीवनसाथी आपल्या बरोबर आपल्या सुखदुःखात वाटेकरी नसणं यातलं दुःख आणि एकाकीपण त्यांना माहितीच नाहीये मुळी. संसार करताना ज्या काही थोड्या फार तडजोडी कराव्या लागतात तेवढ्याच त्यांना माहिती. त्यामुळे लग्नाचे तोटेच त्यांना जाणवतील. म्हणूनच चुकीचं मार्गदर्शन होण्याची शक्यता जास्त.

आपला जिवलग आपल्या सोबत नसण्याचं जे दुःख असतं ना त्याचं या गाण्यातून अगदी अचूक वर्णन केलं आहे...

'तेरे बिना ज़िन्दगी से कोई शिकवा तो नहीं,
शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं
तेरे बिना ज़िन्दगी भी लेकिन
ज़िन्दगी तो नहीं, ज़िन्दगी नहीं
ज़िन्दगी नहीं, ज़िन्दगी नहीं'

जोडीदार नसण्याचं दुःख ज्याच्याबरोबर जोडीदार नाही तोच जाणतो. म्हणूनच आपल्याला मिळालेलं हे आयुष्य भरभरून जगा. योग्य जोडीदार मिळवण्याच्या तुमच्या प्रयत्नांमध्ये आता आमची तुम्हाला साथ असेल.

मेसेंजरमध्ये आम्हाला आजच संपर्क करा आणि तेरा फेब्रुवारीला विष्णुजी की रसोई मध्ये होणाऱ्या भेटीगाठीत आपला मनपसंत जोडीदार मिळतोय का ते पहा आणि पुढचा रोज डे आपल्या व्हॅलेंटाईन बरोबर साजरा करा. 👰🤵

#वधू #वर #मेळावा

विवाहनोंदणी करता आजच संपर्क करा...
11/02/2022

विवाहनोंदणी करता आजच संपर्क करा...

तुझ्यासाठी चंद्रतारे तोडून आणेन.
संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालेन.
वाळवंटात सुद्धा नंदनवन फुलवेन.
सगळ्या जगाला विसरून जाईन.

ही वचनं आता जुनी झाली, नाही का?
त्यापेक्षा...

येताना भाजी नक्की आणेन.
बिल वेळेवर भरेन.
आईबाबांसाठी गिफ्ट आधीच आणून ठेवेन.
छोटूला न रडवता झोपवेन.

अशी वचनं द्यायला कसं वाटेल? पण असं प्रॉमिस करायला किमान एक बेटर हाफ हवी ना?
आम्ही आहोत मदतीला... इनबॉक्स मध्ये आजच संपर्क करा.

टीप : आमचं हे विवाहनोंदणी काम फक्त १४ फेब्रुवारीपर्यंत असेल याची कृपया नोंद घ्यावी.

#सानगौर

 #सानगौर #भेटीगाठी"तुझं तु जमवलं असतंस तर आमच्यावर लक्ष घालायची वेळच आली नसती.""वय वाढत चाललंय नुसतं, पण हिला काही आहे क...
10/02/2022

#सानगौर
#भेटीगाठी

"तुझं तु जमवलं असतंस तर आमच्यावर लक्ष घालायची वेळच आली नसती."

"वय वाढत चाललंय नुसतं, पण हिला काही आहे का त्याचं?"

"सगळ्या गोष्टी वेळेवर नकोत का व्हायला?"

"नाही करायचं का लग्न तुला? मग तसं स्पष्टपणे सांग तरी!"

"हल्लीच्या तुम्हा मुलामुलींना ना क्लॅरिटीच नाहीये कसली."

"या वयात आम्हाला पाच वर्षांची मुलगी होती, हिचं अजून वर संशोधन संपेना."

"हल्ली कोणाच्या कार्याला सुद्धा जावसं वाटत नाही, जो तो ह्याच्या लग्नाचंच विचारतो"

"आजकालच्या मुलामुलींना जबाबदाऱ्या नकोत."

"कोणाशी जुळवून घ्यायला नको. तडजोड म्हणजे काय ते तर माहितीच नाहीये या मुलांना."

हे असे संवाद तुमच्या घरात नेहमी होतात का? अशा संवादांमुळे (की विसंवादामुळे?) तुमच्या मुलांच्या मनात लग्नाबद्दल नकारात्मक भावना निर्माण होतायत हे तुमच्या लक्षात येतंय का? विवाहेच्छुक मुलामुलींचा आत्मविश्वास तुम्ही डळमळीत करताय का?

एक तारखेपासून मेसेंजर, व्हाट्सअप दुथडी भरून वाहतायत, फोन अखंड खणखणतायत... अनेक विवाहेच्छुक मुलामुलींशी मी बोलते आहे.

या मुलामुलींशी बोलताना मला जाणवतं आहे की, या मुलामुलींना लग्न करायचं आहे. त्यांच्या आई-वडिलांसारखाच निकोप सहजीवनाचा आनंद घ्यायचा आहे. फक्त अपत्यप्राप्तीचा आनंद घ्यायचा नाहीये तर उत्तम पालक बनायचं आहे. आपल्या मित्र मैत्रिणींची, समवयस्क बहीण भावंडांची लग्नं अटेंड करताना, तेही आपल्या लग्नाची गुलाबी स्वप्नं बघत आहेत.

पण त्यांच्या मनात आपला कम्फर्ट झोन सोडायची भीती देखील आहे. आपल्या स्वभावात म्हणा किंवा व्यक्तिमत्वात काही बदल आपण घडवून आणायचा आहे का? असेल तर तो बदल काय असेल? याबाबत त्यांच्या मनात संभ्रम आहे. आपण जोडीदार म्हणून कमी पडू का? किंवा होईल ना सगळं व्यवस्थित? जुळतील ना स्वभाव? मिळेल ना थोडं स्वातंत्र्य? थोडी स्पेस राहील ना? अशी साशंकता देखील त्यांच्या मनात आहे.

आधुनिकीकरणाच्या रेट्यात बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. दिवसेंदिवस बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे जर आपलं आयुष्य पुर्वीसारखं राहिलेलं नसेल, तर या नवीन पिढीने आपण पूर्वी वागलो तसच वागण्याची अपेक्षा आपण का करायची?

पण मग करायचं तरी काय???

चला, विवाहेच्छुक मुलामुलींना समजून घेऊया. थोडं आपणही बदलुया. सानगौरच्या उपक्रमात सामील होऊन आई वडील आणि मुलांमधली दरी सांधुया. मुलामुलींना योग्य जोडीदार मिळवण्यात मदत करूया.

सानगौरने आगळ्या वेगळ्या पद्धतीने आखलेल्या भेटीगाठीच्या कार्यक्रमात सहभागी व्हा.
कार्यक्रम फक्त विवाहेच्छुक मुलामुलींसाठीच आहे.
का बरं???
कारण, ही पिढी आमच्याहून अधिक हुशार, अधिक स्मार्ट, अधिक समंजस आणि स्वतःचे निर्णय पूर्ण जबाबदारीने घेणारी आहे यावर आमचा विश्वास आहे म्हणून...
☺️🙏🏻
नोंदणी करता आमच्या मेसेंजर मध्ये संपर्क करा.

अवश्य वाचा...
09/02/2022

अवश्य वाचा...

सध्याच्या लग्नाच्या वयातल्या मुलामुलींचं काही कळतच नाही. आपण म्हणतो ना पुढची पिढी फार हुशार आहे. ती हुशार आहेच, शिक्षण उत्तम घेतात, जॉब पण छान निवडतात. त्यासाठी लागणारं डोकं पण अफाट असतं. पण नेमकं लग्नाच्या वयात येतात तेव्हा हीच मुलं आपली हुशारी वापरताना दिसत नाहीत. लग्न करायचं आहे की नाही ह्यात clarity नसते. आई वडिलांना काहीच नीट सांगत नाहीत. त्यांचे लग्नाबद्दलचे विचार ऐकले की अगदी थक्क होतो मी.

माझं रिटेल काउंटर असल्यामुळे बरेच लोक माझ्याशी दुकानात ह्या बद्दल बोलतात. मागे एक गृहस्थ दुकानात आले होते. ते म्हणाले, "मला मुलाचं लग्न करायचं आहे, कोणी असेल मुलगी तर सांगा."
मी म्हंटलं "सांगतो, काय शिकला आहे मुलगा?"
त्यांनी मला सगळी माहिती सांगितली. सगळी चर्चा झाल्यानंतर मी त्यांना त्याची माहिती आणि पत्रिका व्हाट्स अँप करा असं सांगितल्यावर ते म्हणाले "अहो तो अजून लग्नासाठी तयार नाही"
"काय म्हणतो आहे?" असं विचारल्यावर ते म्हणाले "काहीच बोलत नाही तो."
मग मीच म्हणालो "काका, पहिले तो तयार नसेल तर तुम्ही मला हे सांगून काय फायदा आहे? पहिले त्याला विचारायला पाहिजे ना, त्याला पहिले तयार करायला पाहिजे मग तुम्ही लोकांशी बोलायला पाहिजे. नाही तर आपला सगळा वेळ वाया जाणार नाही का?"

ह्या वरून मला माझ्या लग्नाची गोष्ट आठवली. आमच्याकडे मला आई म्हणाली, "आम्ही आता तुझं लग्न करायचं असं ठरवलं आहे. तू कुठे जमवलं आहेस का? तर आम्हाला सांग. नाहीतर आपण तुझं नाव नोंदवू."
मी म्हणालो "नाही, माझं तसं काही नाही. तुम्ही नाव नोंदवा मी लग्न करायला तयार आहे." संपूर्ण clarity होती माझ्या बोलण्यात. कुठलेही आढेवेढे नाहीत. मग आई बाबांनी पुढाकार घेऊन माझं नाव नोंदवलं. मुली बघायला सुरुवात केली.

मी लग्न करणे ह्याच्याकडे एक प्रोजेक्ट म्हणून पाहिलं आणि त्यावर विचार करू लागलो. माझा रंग काळा, माहितीमध्ये सावळा लिहिलं होतं. 😀 शिक्षण जेमतेम. त्यात व्यवसाय, म्हणजे मुलगी मिळणं कठीणच. त्यात प्रकाशन व्यवसाय कसा असतो? हे तर बरेच लोकांना माहिती नव्हतं. जमेची बाजू एव्हढीच होती की मी पुण्यात राहणार होतो आणि मी स्वतः घेतलेलं माझं सदाशिव पेठेत असणारं दुकान. मला पुणे आणि मुंबईतल्या मुलींची स्थळं यायची नाहीत. मी विचार केला की आपल्याकडे बऱ्याच गोष्टी नाहीत. त्यात व्यवसाय पण वडिलांबरोबर. म्हणजे आपल्याला काही बाबतीत adjustment करावी लागेल. म्हणजे जसं की आपल्याला पुणे मुंबईतील मुली मिळणं कठीण आहे. आपण पुणे मुंबई सोडून इतर ठिकाणच्या मुली बघायच्या. त्याप्रमाणे मी सोलापूर, चिपळूण, कोल्हापूर, नाशिक अश्या विविध ठिकाणच्या मुली पहिल्या. हा मुली पाहण्याचा स्पीडपण चांगला होता. नाशिकला तर मी एका दिवशी चार मुली पहिल्या होत्या. 🤣 मलाही काही मुलींनी नकार दिला, पण ते त्यांचं नशीब. 😀 लग्न करायचं ठरवलं तेव्हापासून दोन महिन्यात लग्न ठरलं आणि कोल्हापूरची मुलगी फसलीच. 🤣

हे सगळं झालं कारण मी त्यावर फोकस होतो. त्यासाठी करावी लागणारी adjustment मी केली होती. मला आपण स्वतः काय आहोत, हे चांगलं माहीत होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुणे मुंबईतल्या मुली नाही आल्या तरी मी रडत बसलो नाही, माझाच मी मार्ग शोधून काढला. गंमत म्हणजे लग्न ठरलं तेव्हा बायकोला भेटायला कोल्हापूरला जायला लाल st च्या तिकिटाचं भाडं देण्याइतके पण पैसे जवळ नसायचे. पण लग्न हा माझ्या आयुष्यात एक खूप मोठा बदल घेऊन आला आणि जोडीदाराच्या नशिबाने पुढे सगळ्या गोष्टी चांगल्या होत गेल्या. एकमेकांच्या सहकार्याने आम्ही येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करत गेलो. हे सगळं शक्य झालं कारण मला लग्न करायचं आहे आणि आपल्याला जी कोणी मिळेल ती चांगलीच असेल ही सकारात्मकता माझ्यात होती.

मी माझं उदाहरण दिलं, कोणाला ह्याचा उपयोग झाला तर बघा. आपल्याला चांगलीच मुलगी मिळेल किंवा चांगलाच मुलगा मिळत आहे ही सकारात्मकता ठेव्हा. 🙏

मला अजूनही ह्या मुलांसाठी लिहिता येईल पण तुर्तास इतकंच. Clarity आणि Focus ठेऊन आपला जोडीदार निवडायला सुरुवात करा. अडचणी येतात, त्या सांगायच्या नसतात. त्यावर मात करायची असते. मग त्या दुसऱ्याला उपयोगी पडतील असं दिसेलं की त्याला सांगायच्या ते ही त्यातून बाहेर पडायला. 😀

#सानगौर
Sanika Wadekar व
Gauri Brahme
यांना मेसेंजरमध्ये संपर्क करा.

08/02/2022

मागच्या वर्षी मुबाना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आमच्या एका मित्राची बायको हे जग सोडून गेली. वय ५१. एकुलत्या एका मुलाचं नुकतंच लग्न झालेलं, तो त्याच्या संसारात गुंग. मित्र अगदी एकाकी पडला. नाही म्हणलं तरी पंचवीस वर्षाची एकमेकांना साथ होती. एकमेकांशी गप्पा, वाद, चर्चा, एकत्र प्रवास, एकत्र सहजीवन याची सवय झालेली असते. हळूहळू आमच्या या मित्राला रोजचं एकाकी आयुष्य खाऊ लागलं. चार दिवस जातात ग इतरांच्या सहवासात, पण त्यानंतर रोजचा दिवस एकटं काढायला कठीण होऊन बसतं, बोलता बोलता एकदा तो हे बोलून गेला.

या आमच्या मित्राच्या मनात आता पुनर्विवाहाचा विचार आला आहे. नातेवाईक जरी वरवर 'चांगला आहे निर्णय' म्हणत असले तरी पाठीमागे बोलायचं ते बोलतातच. काय गरज आहे या वयात लग्न करायची? निवांत राहायचं, फिरायचं, स्वातंत्र्य उपभोगायचं. कशाला नसते व्याप करायचे? दुसरी बायको चांगली असेलच कशावरून? लागते कशाला बायको या वयात? (हास्यास्पद!) अशा अनेक टिप्पण्या करतात. पण लग्न न करणे (यावर लिहिणारच आहे) हा जसा आत्ताच्या पिढीतल्या अनेकांचा चॉईस आहे तसाच तो या वयात देखील करणे हा चॉईस असू शकत नाही का? सहजीवनाचा अधिकार प्रत्येकाला आहे. आपण जर का समाजात एकत्र राहणार असू, तर त्या अनुषंगाने आपली कौटूंबिक, भावनिक गरज पूर्ण करण्याचा प्रत्येकाला पूर्ण अधिकार आहे. समाज चार क्षण आनंदात घालवायला पुरेल पण दैनंदिन आयुष्य आनंदी करायला पूरक जोडीदारच लागतो. या मित्राचं लग्न आता जवळजवळ ठरण्याच्या बेतात आहे. याचा मला प्रचंड आनंद होत आहे. मी मस्त पैठणी नेसून दोघांना शुभेच्छा द्यायला जाणार आहे. लग्न कोणत्याही वयात होवो, दोन जीव एकत्र येऊन एकमेकांच्या आयुष्यात रंग भरणार आहेत याचा आनंद व्हायलाच हवा, नाही का?

तर विवाहेच्छुक मित्रमैत्रिणींनो, यंदा तुम्हाला कर्तव्य असेल तर आमच्याशी अवश्य संपर्क साधा. प्रथमवर, घटस्फोटीत, विधवा, विधुर, ४०+ अशा सर्व लोकांसाठी आम्ही साथीदार शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा!

 #सानगौर #व्हॅलेंटाईन_रोज_डे 🌹किती व्हॅलेंटाईन आले आणि तसेच रिते गेले. ना कोणाला गुलाब दिले, ना कोणाकडून घेतले! माझ्या म...
08/02/2022

#सानगौर
#व्हॅलेंटाईन_रोज_डे 🌹

किती व्हॅलेंटाईन आले आणि तसेच रिते गेले. ना कोणाला गुलाब दिले, ना कोणाकडून घेतले! माझ्या मनातला राजकुमार/ राजकुमारी भेटलेच नाहीत. कालही माझा साथीदार माझ्याबरोबर नव्हता आणि आजही नाहीये.

'असा काय फरक पडतो हो नाही झालं लग्न तर?' असा प्रश्न लग्न झालेल्या लोकांना विचारायची चूक करू नका बरं! 😉 कारण, लग्न न होणं आणि आपला जीवनसाथी आपल्या बरोबर आपल्या सुखदुःखात वाटेकरी नसणं यातलं दुःख आणि एकाकीपण त्यांना माहितीच नाहीये मुळी. संसार करताना ज्या काही थोड्या फार तडजोडी कराव्या लागतात तेवढ्याच त्यांना माहिती. त्यामुळे लग्नाचे तोटेच त्यांना जाणवतील. म्हणूनच चुकीचं मार्गदर्शन होण्याची शक्यता जास्त.

आपला जिवलग आपल्या सोबत नसण्याचं जे दुःख असतं ना त्याचं या गाण्यातून अगदी अचूक वर्णन केलं आहे...

'तेरे बिना ज़िन्दगी से कोई शिकवा तो नहीं,
शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं
तेरे बिना ज़िन्दगी भी लेकिन
ज़िन्दगी तो नहीं, ज़िन्दगी नहीं
ज़िन्दगी नहीं, ज़िन्दगी नहीं'

जोडीदार नसण्याचं दुःख ज्याच्याबरोबर जोडीदार नाही तोच जाणतो. म्हणूनच आपल्याला मिळालेलं हे आयुष्य भरभरून जगा. योग्य जोडीदार मिळवण्याच्या तुमच्या प्रयत्नांमध्ये आता आमची तुम्हाला साथ असेल.

आम्हाला आजच संपर्क करा आणि तेरा फेब्रुवारीला विष्णुजी की रसोई मध्ये होणाऱ्या भेटीगाठीत आपला मनपसंत जोडीदार मिळतोय का ते पहा आणि पुढचा रोज डे आपल्या व्हॅलेंटाईन बरोबर साजरा करा. 👰🤵

आमच्या लग्नाची गोष्ट'माझ्याशी लग्न करशील का?'त्याने मला कोणतेही आढेवेढे न घेता थेट विचारलं होतं. ते ही आम्ही भेटल्याच्या...
08/02/2022

आमच्या लग्नाची गोष्ट

'माझ्याशी लग्न करशील का?'
त्याने मला कोणतेही आढेवेढे न घेता थेट विचारलं होतं. ते ही आम्ही भेटल्याच्या फक्त चौथ्या दिवशी. मी पटकन उत्तर दिलं नाही.
'काय झालं? मी पसंत नाही?'
'नाही, तसं नाही. पण..
'पण काय? पैसा, नोकरी, घर, गाडी, पगार यातलं काही नाही माझ्याकडे. ते मिळवीन. पण आधी तुझा होकार हवा.'
'ते कारण नाही, पण आपली...
'आपली काय? जात, राहणीमान, आवडनिवड? हे कारण आहे का? काय असेल ते स्पष्ट सांग. चार दिवस भेटल्यानंतर मी हे नक्कीच सांगू शकतो की आपल्यात यातले कुठलेही भेद फारसे मॅटर होणार नाहीत.'
'तसं नाही. आपली ना........................उंची अगदी एकसारखी आहे! मी ५'३ तू ५'५. नवरा थोडा तरी उंच हवा ना बायकोपेक्षा? लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणतात ना तो, अगदी आयडियल. तसे नाही आहोत आपण.'

हे कारण ऐकून नवरा खो खो हसला होता. मग तो विषय हसण्यावारीच गेला. लग्नानंतर मी प्रत्येक फोटोत बारकाईने आम्ही विजोड तर दिसत नाही हे पाहत असे. बालिशपणाच म्हणा हवं तर माझा! वर्ष जात राहिली तसं समजत गेलं की निवड जरी बाह्यरूपावर अवलंबून राहून केलेली असली तरी संसार जुळवण्याचं काम मनाचंच असतं. प्रत्येक जोडी लक्ष्मीनारायणाची नसते, नसावी, पण ती एकमेकांना पूरक साथ देणारी जरूर असावी. आपल्या जोडीदारात काय आहे त्यापेक्षा त्याच्यात जे नाहीये ते मी भरून काढून आमचं सहजीवन सुखी कसं करता येईल या निकषावर लग्न करावं. आपले गुण अवगुण आपल्याला व्यवस्थित माहीत असतात. आपण स्वतःच जर 'आयडियल' नाही तर 'आयडियल' जोडीदार ही अपेक्षा फोलच ठरेल, नाही का?

तर विवाहेच्छक मुलामुलींनो, यंदा कर्तव्य असेल तर आमच्याशी इनबॉक्समध्ये अवश्य संपर्क साधा. आम्ही तुमच्यासाठी अगदी 'आयडियल' नाही पण सुयोग्य जोडीदार शोधायला मदत नक्की करू. तसेच १३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पुण्यात होणाऱ्या ब्राह्मण वधूवरांच्या एका भेटीगाठीच्या कार्यक्रमातही आपण भेटू शकतो. मग फार वाट पाहू नका. आजच मेसेज करा.
#सानगौर

 #सानगौरविवाहेच्छुक मुलांनो आणि मुलींनो,भावनिक सुरक्षिततेसाठी, स्थैर्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी लग्न आणि कुटुंबव्यवस्...
07/02/2022

#सानगौर

विवाहेच्छुक मुलांनो आणि मुलींनो,

भावनिक सुरक्षिततेसाठी, स्थैर्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी लग्न आणि कुटुंबव्यवस्था महत्वाची आहे हे या कोविड काळात प्रत्येकाला चांगलंच पटलं आहे.

एकच लक्षात ठेवा, आपल्या जोडीदाराची निवड कोणाच्याही दबावाखाली करू नका. आधी स्वतःला ओळखा, स्वतःचे गुणावगुण जाणून घ्या. नंतर स्वतःला परफेक्ट मॅच नव्हे तर पूरक जोडीदार निवडा.

विवेकी, विचारी आणि हुशार तुम्ही आहातच. आता फक्त जोडीदाराचे तुमचे निकष आम्हाला कळवा आणि तुमचा जोडीदार शोधण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवा.

ब्राह्मण वधुवरांसाठी गेली सात वर्षे अव्याहतपणे काम करणाऱ्या आमच्या मैत्रिणींना मदत म्हणून आमचा खारीचा वाटा आम्ही उचलतो आहोत, ब्राह्मण वधुवरांच्या भेटीगाठीचा एक कार्यक्रम आयोजित करून. एकमेकांना भेटून, एकमेकांशी बोलून, एकमेकांना जाणून घेऊन तुम्ही परस्परपूरक आहात का हे पाहण्यासाठी हा गेट टूगेदरचा कार्यक्रम सहाय्यभूत होईल असं आम्हाला वाटतं.

येताय ना मग?

अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा.

Address

Pune
411001

Telephone

+919422770407

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SanGaur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category


Other Event Planners in Pune

Show All

You may also like